गुरुपौर्णिमा चे महत्व
▪️उन्हाळा संपल्यानंतर येणाऱ्या आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला (जुलै-ऑगस्ट दरम्यान) गुरु पौर्णिमा म्हणून ओळखले जाते.
▪️ या पवित्र दिवशी शिव - आदियोगी म्हणजे पहिला योगी यांनी पहिल्यांदा सप्तर्षीं – सात जगप्रसिद्ध ऋषी – जे त्यांचे पहिले शिष्य होते, त्यांच्यामध्ये योग विज्ञान संक्रमित केले.
▪️ या दिवशी आदियोगी, आदि गुरु अर्थात प्रथम गुरु बनले.
▪️सप्तर्षींनी या ज्ञानाचा जगभर प्रसार केला, आणि अगदी आजही, या पृथ्वीतलावरील प्रत्येक आध्यात्मिक प्रक्रियेमागे आदियोगींनी निर्माण केलेल्या अदभूत ज्ञानाची प्रेरणा आहे.
▪️गुरु हा शब्द संकृत भाषेत “अंधकार दूर करणारा” या अर्थाने वापरला जातो.
▪️गुरु साधकाचे अज्ञान दूर करतो, आणि त्याच्या आत असलेला निर्मितीचा स्त्रोत अनुभवण्याची क्षमता निर्माण करतो.
▪️ गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारंपरिकरित्या साधक त्यांच्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतात.
▪️ योग साधना आणि ध्यान यांचा अभ्यास करण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस विशेष फायदेशीर मानला जातो.
▪️आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात.
▪️या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो.
▪️प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा देत असत.
▪️चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषिंची आजच्या दिवशी पूजा केली जाते.
▪️ व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्यगुरू आहेत.
▪️त्यामुळे गुरू पौर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते.
▪️म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे.
▪️ जगात असे कोणतेही ज्ञान नाही जे महर्षी व्यासांनी सांगितले नाही म्हणून म्हणतात 'व्यासोच्छीष्टं जगत् सर्वं'
0 Comments