Top Updates

6/recent/ticker-posts

वर्षा ऋतु

 वर्षा ऋतु
बस्ती -आयुर्वेद हे शास्त्र शरीराचं स्वास्थ्य टिकविणं व काही आजार झाल्यास ते बरे करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. 
▪️साधारणत: पाच हजार वर्षापासून आयुर्वेद हे शास्त्र जगामध्ये वापरलं जात आहे. 
▪️विशेषत: आपल्या भारत देशासाठी असणा-या हवामानासाठी बस्ती अतिशय उपयोगी आहे. म्हणूनच त्याला देशी चिकित्सा असं म्हणतात.
▪️ आयुर्वेदामध्ये शरीर आजारी न पडता स्वास्थ्य टिकवण्यासाठी दररोज आवश्यक असणारा आहार, व्यायाम, योग याचं संबंधित व्यक्तीनुरूप म्हणजेच प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळं प्रमाण सांगितलेलं आहे. 
▪️एकमेव असं हे शास्त्र आहे जे प्रत्येक व्यक्तीसाठी असलेल्या गरजेनुसार स्वास्थ्य टिकवण्यासंबंधित चिकित्सा करते.
▪️  शरीरातील रोज होणारी झीज भरून काढण्यासाठी आपल्याला आहाराची आवश्यकता असते.
▪️ त्यासाठी आपण दररोज परिपूर्ण आहार घेत असतो, तरीही वातावरणातील बदलामुळे (ऋतुमानानुसार) काही आजार उद्भवू शकतात. 
▪️त्या आजारामध्ये सर्दी, खोकला, अतिसार, ताप, आम्लपित्त इ. विकारांचा समावेश होतो.
▪️यासाठी आयुर्वेदामध्ये पंचकर्म – पाच चिकित्सांचा समूह, जसं की वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण अशा उपचार पद्धतींचा वापर केला जातो. 
▪️पंचकर्म ही क्रमवार पद्धतीनं करण्याची चिकित्सा आहे. यामध्ये दोन पद्धतीनं चिकित्सा करतात.
▪️पहिली चिकित्सा सर्वसामान्यांसाठी पंचकर्म किंवा ऋ तुपरत्वे सर्वासाठी केलं जाणारं पंचकर्म.
१) पावसाळा – स्नेहन, बस्ती (वात)
२)उन्हाळा – विरेचन (पित्त), रक्तमोक्षण
३) हिवाळा – वमन, नस्य

                                   



Post a Comment

0 Comments