सरकारी योजना

संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन भाग - १
प्रस्तावना
भारत सरकार आणि
महाराष्ट्र शासन मिळून देशातील प्रत्येक नागरिकाच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी
अविरतपणे कार्यरत आहेत. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, मग तो शेतकरी असो, महिला असो, विद्यार्थी असो
किंवा गरजू नागरिक असो, विकासाची गंगा पोहोचावी या उदात्त हेतूने अनेक कल्याणकारी
योजना राबवल्या जातात. शिक्षण, आरोग्य, रोजगार, घरकुल आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या मूलभूत
गरजा पूर्ण करून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हे या योजनांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
बऱ्याचदा
नागरिकांना या योजनांची माहिती नसते किंवा असली तरी अर्ज प्रक्रिया क्लिष्ट वाटू
शकते. त्यामुळे अनेक पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. हीच अडचण
दूर करण्याच्या उद्देशाने, या लेखात आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या काही महत्त्वाच्या
आणि लोकप्रिय योजनांची सविस्तर माहिती घेणार आहोत. या योजनांचा उद्देश काय आहे, लाभ कोणाला मिळू
शकतो, आवश्यक कागदपत्रे
कोणती आणि अर्ज कसा करायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळतील. चला, तर मग या
योजनांच्या विश्वात एक माहितीपूर्ण प्रवास करूया आणि आपले हक्क जाणून घेऊया.
महिला आणि मुलींच्या
सक्षमीकरणासाठीच्या योजना
उज्वल भविष्याची
पायाभरणी
'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या अभियानांतर्गत
मुलींच्या जन्मापासून त्यांच्या शिक्षणापर्यंत आणि सक्षमीकरणापर्यंत सरकार विविध
योजनांच्या माध्यमातून पाठिंबा देत आहे.
सुकन्या समृद्धी
योजना (SSY)

मुलींच्या उज्वल
भविष्यासाठी, विशेषतः
त्यांच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी तरतूद करणारी ही एक लोकप्रिय बचत योजना
आहे.सुकन्या समृद्धी ही योजना बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानाचा एक भाग आहे. सुकन्या
समृद्धी या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर चांगला परतावा मिळतो आणि करसवलत (income tax exemption) देखील उपलब्ध आहे.
उद्दिष्ट: मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पालकांना आर्थिक बचत करण्यास प्रोत्साहित करणे.सुकन्या समृद्धी ही योजना बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानाचा एक भाग आहे.
लाभाचे स्वरूप: ही एक दीर्घ
मुदतीची गुंतवणूक योजना असून यामध्ये आकर्षक व्याजदर मिळतो, जो चक्रवाढ
पद्धतीने वाढतो.या योजनेतील गुंतवणुकीवर आणि मिळणाऱ्या परताव्यावर आयकर
कायद्याच्या कलम ८०-सी अंतर्गत कर सवलत मिळते.
कालावधी: सुकन्या समृद्धी
योजनेत खाते उघडल्यापासून 21 वर्षांनी खाते
परिपक्व (mature) होते किंवा मुलगी
18 वर्षांची
झाल्यानंतर लग्नाच्या कारणांसाठी 50% रक्कम काढता येते.
गुंतवणूक: सुकन्या समृद्धी
योजनेत दरवर्षी किमान ₹250 आणि कमाल ₹1.5 लाख रुपये जमा
करता येतात.
खाते हस्तांतरण: सुकन्या समृद्धी
योजनेत एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा एका बँकेतून दुसऱ्या
बँकेत हे खाते हस्तांतरित करता येते.
पात्रता: १० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीच्या नावाने पालक किंवा कायदेशीर guardian हे खाते उघडू शकतात.हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा अधिकृत बँकेत उघडता येते. फक्त एका मुलीच्या नावे हे खाते उघडले जाऊ शकते.
माझी कन्या भाग्यश्री
योजना (महाराष्ट्र सरकार)

मुलींचा जन्मदर
वाढावा आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने ही
योजना सुरू केली आहे. मुलींचे शिक्षण आणि आरोग्य सुधारण्यासोबतच बालविवाह
रोखण्यासाठी व मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक मदत करते. माझी कन्या भाग्यश्री
या योजनेत मुलींच्या नावे मुदत ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) केली जाते आणि त्यांना १८
वर्ष पूर्ण झाल्यावर व्याजासह रक्कम दिली जाते.
उद्दिष्ट: मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि
सर्वांगीण विकास साधणे.मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, लिंग निवडीला
प्रतिबंध करणे.मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे.
लाभाचे स्वरूप: एका मुलीनंतर
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबाला मुलीच्या नावावर ५०,००० रुपये आणि
दोन मुलींनंतर शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही मुलींच्या नावावर प्रत्येकी २५,००० रुपये बँकेत
जमा केले जातात.ही रक्कम मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिला व्याजासह मिळते.
माझी कन्या
भाग्यश्री योजनेचा लाभ कोणाला मिळेल?
माझी कन्या
भाग्यश्री या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील कुटुंबांना मिळतो.
कुटुंब नियोजन
(नसबंदी) शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या पालकांसाठी ही योजना
आहे.
अर्ज प्रक्रिया: अंगणवाडी सेविका
किंवा ग्रामपंचायत कार्यालयात या योजनेसाठी अर्ज करता येतो.
लेक लाडकी योजना
(महाराष्ट्र सरकार)

ही योजना मुलींना
जन्मापासून ते शिक्षणापर्यंत विविध टप्प्यांवर आर्थिक सहाय्य प्रदान करते.मुलगी
जन्माला आल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी आर्थिक मदत करणारी एक
योजना आहे, जी मुलींना १ लाख
१ हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाच टप्प्यांमध्ये देते. या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि
केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांना लाभ मिळतो
उद्दिष्ट: मुलींचा जन्मदर
वाढवणे, मुलींच्या
शिक्षणाला प्रोत्साहन देणे,
बालविवाह रोखणे, मुलींचे कुपोषण
कमी करणे. गरीब कुटुंबातील मुलींना जन्मापासून शिक्षणापर्यंत आर्थिक आधार देणे, जेणेकरून त्यांचे
शिक्षण पैशांअभावी थांबू नये.
लाभाचे स्वरूप: पिवळ्या आणि
केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबात मुलगी जन्माला आल्यास तिला विविध टप्प्यांवर एकूण १
लाख १ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत मुलगी पहिलीत गेल्यावर, सहावीत, अकरावीत आणि १८
वर्षे पूर्ण झाल्यावर अशा टप्प्यांमध्ये विभागून दिली जाते.
आर्थिक मदत (पाच
हप्त्यांमध्ये)
जन्मवेळी: 5,000 रुपये
इयत्ता ६ वी
प्रवेश घेताना: 7,000 रुपये
इयत्ता ११ वी
प्रवेश घेताना: 8,000 रुपये
१८ वर्ष पूर्ण
झाल्यावर: 75,000 रुपये
एकूण रक्कम: 1,01,000 रुपये
लेक लाडकी
योजनेचा कालावधी आणि पात्रता
लेक लाडकी ही
योजना १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठी आहे.
लेक लाडकी या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी
शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळतो.
अर्ज प्रक्रिया: या योजनेचा अर्ज
जवळच्या अंगणवाडी किंवा जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद
कार्यालय किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात या योजनेचा अर्ज
उपलब्ध असतो.
आवश्यक कागदपत्रे
योजनेचे अर्ज आणि
आवश्यक कागदपत्रांची माहिती तुम्हाला महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातून
मिळते.
शेतकरी
बांधवांसाठीच्या योजना

देशाचा कणा
असलेल्या बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि शेतीमधील जोखीम कमी
करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनांचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे
उत्पन्न वाढवणे, त्यांना आर्थिक
स्थैर्य देणे आणि आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहित करणे हा आहे.
प्रधानमंत्री
किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना
ही केंद्र
सरकारची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्याद्वारे
शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते.
उद्दिष्ट: शेतकऱ्यांना
शेतीसाठी आवश्यक असणारा खर्च भागवता यावा आणि त्यांना कोणत्याही सावकारावर अवलंबून
राहावे लागू नये, यासाठी आर्थिक
सहाय्य करणे.
लाभाचे स्वरूप: या योजनेंतर्गत
पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात.ही रक्कम प्रत्येकी २,००० रुपयांच्या
तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
पात्रता: ज्या शेतकरी
कुटुंबांच्या नावावर लागवडीयोग्य जमीन आहे, ती सर्व कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत. सुरुवातीला
असलेली २ हेक्टरची मर्यादा आता काढून टाकण्यात आली आहे, ज्यामुळे अधिक
शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे.
अर्ज प्रक्रिया: या योजनेचा लाभ
घेण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील तलाठी, कृषी सेवक यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा 'पीएम-किसान'च्या अधिकृत
वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करू शकता. यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक आणि
जमिनीचा सातबारा उतारा आवश्यक असतो.
प्रधानमंत्री पीक
विमा योजना (PMFBY)
नैसर्गिक
आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी ही
योजना अत्यंत महत्त्वाची आहे.
उद्दिष्ट: पूर, दुष्काळ, गारपीट, वादळ अशा
नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देणे.
लाभाचे स्वरूप: या योजनेत शेतकरी
खरीप, रब्बी आणि नगदी
पिकांचा विमा उतरवू शकतात. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा रकमेच्या २%, रब्बीसाठी १.५%
आणि नगदी पिकांसाठी ५% इतका नाममात्र हप्ता भरावा लागतो. उर्वरित हप्त्याची रक्कम
सरकार भरते. नुकसान झाल्यास, पंचनाम्यानंतर विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
होते.
अर्ज प्रक्रिया: शेतकरी आपल्या
जवळच्या राष्ट्रीयकृत बँक,
सहकारी बँक किंवा
आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन या योजनेत सहभागी होऊ शकतात. पीक पेरणीच्या अंतिम
तारखेपूर्वी अर्ज करणे बंधनकारक असते.
"सरकारी योजनांचा
हा प्रवास इथेच थांबत नाही! तुम्हालाही जाणून घ्यायचे आहे का की, उत्तम
आरोग्यासाठी सरकार कोणती मदत करते आणि नोकरीच्या संधी कशा मिळवायच्या? तर मग आमचा पुढचा
ब्लॉग नक्की वाचा,
जिथे आपण आरोग्य आणि रोजगार या विषयांवर सखोल माहिती घेणार
आहोत."
"माहिती हेच खरे
सामर्थ्य आहे! योग्य वेळी मिळालेली अचूक माहिती आपले भविष्य उज्ज्वल करू शकते.
तुम्ही ज्ञानाच्या या प्रवाहापासून दूर राहू नये, यासाठी आमच्या
ब्लॉगला आजच फॉलो करा. चला, एकत्र मिळून माहितीच्या या प्रवासात पुढे जाऊया
आणि आत्मनिर्भर बनूया!"
0 Comments